mseb
mseb 
मुख्य बातम्या मोबाईल

बारामतीमध्ये महावितरणसमोर ठिय्या...

सरकारनामा ब्यूरो

बारामती: शेतकरी अडचणीत असताना त्याच्या कृषीपंपाची वीज जोडणी तोडण्याचे काम सुरु आहे. तोडलेल्या जोडण्या पुन्हा पूर्ववत कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. 24) दिला. येथील महावितरणच्या कार्यालयासमोर रासपच्या वतीने आज ठिय्या आंदोलन केले गेले. त्या वेळी हा इशारा देण्यात आला. 

रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, तालुकाध्यक्ष अॅड.अमोल सातकर,  जिल्हा प्रभारी किरण गोफणे,  सतीश शिंगाडे, किसन हंडाळ,  लखन कोळेकर,  शैलेश थोरात,  विठ्ठल देवकाते,  महादेव कोकरे, काकासाहेब बुरुंगले,  चंद्रकांत वाघमोडे,  तानाजी मारकड,  कमलेश हिरवे,  किशोर सातकर,  निखिल दांगडे,  तुषार गुलदगड,  अण्णा पांढरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

शेती पंपाची तोडण्यात आलेली वीज तातडीने जोडावी, रोहित्र सोडवणे तात्काळ थांबवावे आदी मागण्या यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रोहित्र सोडवले जात आहे. यासंबंधी गेल्या आठवड्यात राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवेदन देण्यात आले होते. परंतु  त्यानंतरही वीज तोडणी मोहिम न थांबवल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे संदीप चोपडे व अॅड. अमोल सातकर यांनी सांगितले. वीज नसल्याने शेतक-यांची हातातोंडाशी आलेली पिके जळून जावू लागली आहेत. कोरोना मुळे शेतकरी पूर्णपणे मोडला असताना महावितरणने त्यात भर टाकल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT